मुंबईने आणखी किती सहन करायचे?

November 27, 2008 Leave a Comment


वीस तासांहून अधिक काळ लोटला तरी मुंबईतील दहशतीचे वातावरण अजून कायम आहे. हॉटेल ताज पॅलेस, ट्रायडेन्ट टॉवर्स (पूवर्वीचे अोबेरॉय) व नरिमन हाऊस येथे अजूनही काही अतिरेकी अाहेत. या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा दल, नौसेना आणि मुंबई पोलिस यांची संयुक्त कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही सुरू होऊनही आता सुमारे आठ ते दहा तासांचा कालावधी लोटला आहे. काल रात्री सुरू झालेल्या या भयनाट्यात पोलिस दलातील तीन खंदे वीर - राज्य अतिरेकी विरोधी दलाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसातील अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर धारातीथर्थी पडले. या तीन वीरांसह ११ पोलिस आणि १०० हून अधिक नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईला आणि मुंबईकरांना सलाम करण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबई हल्ल्याची छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :



0 comments »